अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ; वाचा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम 

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार देशातील एकूण सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजेल पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल

दुसरा टप्पा – 26 एप्रिल

तिसरा टप्पा – 7 मे

चौथा टप्पा – 13 मे

पाचवा टप्पा – 20 मे

सहावा टप्पा – 25 मे

सातवा टप्पा – 1 जून