इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी, वर्ध्यातील सभेतुन पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरीविरोधी असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांची स्थिती अनेक दशकांपासून वाईट आहे. कुटुंबाच्या नावावर दगड घातला, पण अनेक पिढ्या उलटल्या पण काम पूर्ण झाले नाही. समस्या सोडवण्याबरोबरच शक्यता निर्माण करण्याचे कामही करत आहोत, असे ते म्हणाले.