इर्शाळवाडी दुर्घटना : कष्टाने उभं केलेल्या घरावर दरड कोसळली अन् सर्व नष्ट झालं

मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. प्रशासनाकडून दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावरुन मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. 

या दुर्देवी घटनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. इर्शाळवाडीत किती घर आहेत? लोकवस्ती किती आहे? सर्वप्रथम घटनास्थळी कोण पोहोचल? मदत कार्यात काय अडथळे येत आहेत? त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इर्शाळगड हे गाव डोंगरावर आहे. तिथे जाण्याचा रस्ता अवघड आहे. अशा ठिकाणी भूस्खलन झालं. तिथे 48 घर आहेत. त्या गावची लोकसंख्या 225 आहे. भूस्खलनाबद्दल समजल्यानंतर सर्वप्रथम तहसीलदार तिथे पोहोचले. अंधार होता. पाऊस सुरु होता. रेसक्यु ऑपरेशन सुरु करणं कठीण होतं. मुख्यमंत्र्यांनी आणि मी गिरीश महाजन यांना विनंती केली. महाजन आणि स्थानिक आमदार महेश बाल्टी लागोलाग तिथे पोहोचले. ३.१५ वाजता ते घटनास्थळावर दाखल झाले. रस्ता नसल्यामुळे एक-सव्वा तास पायी चालत जाव लागलं” असं देवेंद्र फडणवी यांनी सांगितलं.

रात्री रेसक्यु ऑपरेशन शक्य नव्हतं, तरी जेवढे लोक काढणं शक्य होतं, तो प्रयत्न सुरु झाला. तिथे जेसीबी जाणं शक्य नाहीय. त्यामुळे टीडीआरएफ, एनडीआरएफच्या टीमकडून पहाटेकडून काम सुरु आहे” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

गिरीश महाजन यांच्याशी मी बोललो. तिथे प्रचंड पाऊस सुरु आहे. रेसक्युकामात प्रचंड अडचणी आहेत. रात्रीपासून महाजन त्या ठिकाणी आहेत. मी, मुख्यमंत्री आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्री पहाटे निघाले. मुख्यमंत्री रेसक्यु ऑपरेशन मॅनेज करतायत. दोन-अड़ीच टनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का? याचा विचार सुरु आहे. परंतु सध्याच्या वातावरणात तिथे हेलिकॉप्टरच पोहोचणही शक्य नाहीय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

परिस्थिती कठीण आहे. उदय सामंत, दादा भुसे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहेत. कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.