‘उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे’, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

जळगाव  : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितले आहे की हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढासळला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे.अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे , असं त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

लोकभा निवडणुकांचे तीन टप्पे पार पडले. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मतदान पार पडलं असून काही टप्प्यातील मतदान बाकी आहे. याचदरम्यान राजकीय वातावरण भलंतच तापलं असून आरोप -प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या एका वक्तव्याला उद्धव यांनी प्रत्युत्तर दिले.त्यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची ही टीका देवेंद्र फडणवीस यांना रुचली नसून त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी
भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत. भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत. ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुवास करण्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत ते आम्ही दूर करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.