उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे तर दोनदा केली पीएम मोदींशी बेईमानी; कुणी केला हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींशी एकदा नव्हे तर दोनदा बेईमान केली, असा हल्लाबोल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात शिवसेनेची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हे कामगार तुमचा नाश करतील आणि तुमच्यावर ‘हम दो हमारे दो’ अशी परिस्थिती येईल. धनुष्यबाणाचे लक्ष्य लक्षात येताच तुम्ही पक्ष निधीतून ५० कोटी रुपये काढून घेतले. आम्हाला पैसे नकोत तर बाळासाहेबांचे विचार आहेत म्हणून आम्ही लगेच पैसे दिले.