उन्हाळी निवडणुकीसाठी कामगार-मतदारांनी तंदुरुस्त राहावे : मोदींचा मंत्र

देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. शेवटच्या टप्प्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात कडक उष्मा असेल. सर्व मुद्द्यांसह, सोमवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी देशातील मतदारांना आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना तंदुरुस्त राहण्याचा मंत्र दिला आहे.