उपोषणस्थळावरील मंडप हटवण्याचे आदेश, जरांगें संतापले

मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आजच्या अधिवेशनात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगें यांच्या उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस देखील पोहोचले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनोज जरांगें पाटील चांगलेच संतापले आहेत.