‘एक राखी वृक्षाला’, राखी बांधून महिलांनी केला झाडे रक्षणाचा संकल्प

नंदुरबार : सामाजिक, नैसर्गिक बांधीलकी जोपासणे ही मानवाची जबाबदारी आहे. जगदगुरु संत तुकोबा रायांच्या अभंगातील या ओळी. नंदुरबार जिल्ह्यात शिर्वे येथील महिलांनी सत्यात उतरवल्या आहेत.

ऑक्सिजन देऊन माणसांना जगवणाऱ्या वृक्षांना राखी बांधून; निसर्ग आपला सखा आहे याची जाणीव या महिलांनी करून दिलीय. म्हणूनच संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी सार्थकी ठरतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षांना बांधू रक्षाबंधने…!

 

जिल्ह्यातील शिर्वे येथे वनाचल समृद्धी अभियान, महिला बचत गटातर्फे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी वृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी वनाचल समृद्धी अभियानाचे प्रतिनिधी व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.