एक सिरियल किलर सकाळी येड्यासारखा बडबडबतो; आशिष शेलार यांची जहरी टीका

मुंबई : लोक सकाळी ९.३० टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनानिमित्त मुंबईतील एका कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते.

देशात संविधान नाही, कायद्याचं अस्तित्व नाही, हम करे सो कायदा अशी स्थिती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. त्यावरून आशिष शेलार यांनी टीका केली. ते म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे असा अपप्रचार किमान संजय राऊत यांनी करू नये. संविधानामुळे ते आज जामिनावर आहेत.

वरळीत लेजर शो आयोजित करण्यात आलाय. हा लेझर शो करण्याचे विशेष राजकीय कारण नाही. जांबोरी मैदानात समाज एकत्रित येतो. तो भाग मध्यवर्तीय आहे. त्यामुळे तिथे कार्यक्रम घेत आहोत, असंही शेलार यांनी स्पष्ट केलंय.