---Advertisement---

एनडीए की इंडिया, कोणाचे सरकार स्थापन होणार ? अखिलेशने सांगून टाकलं, दिल्लीला रवाना !

---Advertisement---

कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांचा १७००७६ मतांनी पराभव केला. अखिलेश यांना एकूण 640207 मते मिळाली, तर सुब्रता यांना केवळ 470131 मते मिळाली.

मतमोजणीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास अखिलेश यादव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सपाचे जिल्हाध्यक्ष कलीम खान, माजी आमदार कालियन सिंग दोहरा, माजी आमदार ताहिर हुसैन सिद्दीकी यांच्यासह अनेक नेते त्यांच्यासोबत पोहोचले.

जिल्हा निवडणूक अधिकारी शुभ्रांत कुमार शुक्ला यांनी अखिलेश यादव यांना विजयाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. यानंतर अखिलेश यादव पक्ष कार्यालयात पोहोचले. कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी समर्थकांनी ढोल वाजवून विजय साजरा केला. उपस्थित नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. सुमारे 20 मिनिटे वाट पाहिल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, त्यांना लवकरच दिल्ली गाठायचे आहे. त्यांच्या आगमनानंतरच केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.

पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून अखिलेश कन्नौजला पोहोचले

निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी बुधवारी सकाळी कन्नौजमध्ये येण्याची घोषणा केली होती, मात्र सकाळी त्यांनी अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या फ्लाइटने दिल्लीला जाणार असताना  सपाचे जिल्हाध्यक्ष कलीम खान आणि जय तिवारी यांनी फोन केला. दोन्ही नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच सकाळपासूनच कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. तूम्ही 10 मिनिटांसाठी आला तर बरं होईल. यामुळे अखिलेश यादव कारने कन्नौजला पोहोचले. येथून ते थेट दिल्लीला रवाना झाले.

भाजपला बहुमत न मिळाल्याने त्यांना मित्र पक्षांची गरज भासणार आहे. त्यामूळे नेमक कुणाचं सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.  कारण दुसरीकडे इंडिया आघाडीनेही प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, ५ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांना समर्थन दिल्याने पुन्हा मोदी सरकार स्थापन होणाऱ असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात किंवा आठ तारखेला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment