ओडिशा रेल्वे दुर्घटना : सर्व खासदारांनी महिन्याचा पगार द्यावा, कुणी केलं मदतीचं आवाहन

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर इथं झालेल्या तीन ट्रेन्समधील भीषण अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातातील अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन भाजप खासदार वरुण गांधी यांनी केलं आहे. आपला एक महिन्याचा पगार त्यांनी यासाठी द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले वरुण गांधी?
ओडिशातील रेल्वे दुर्घटना विदारक आहे. ज्या कुटुंबियांना या दुर्घटनेमुळं उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांच्यासोबत पहाडासारखं उभं रहावं लागेल. माझं सर्व खासदारांना आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या पगारातील एक हिस्सा या पीडित कुटुंबियांसाठी देत त्यांची मदत करण्यासाठी पुढे यायलं हवं. पहिल्यांदा त्यांना सहकार्य मिळायला हवं नंतर न्याय.