काँग्रेसकडून काय अपेक्षा ठेवायची, अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक रिंगणात जोरदार कंबर कसली आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते अनुराग ठाकूर यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेबाबत दिलेल्या वक्तव्यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजप नेत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, ‘काँग्रेस हा पक्ष आहे जो संरक्षण सौद्यांमध्ये कमिशन घेतो. जीप घोटाळा, बोफोर्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, पाणबुडी घोटाळा आणि इतर अनेक घोटाळे काँग्रेसने केले. ज्या काँग्रेसने 10 वर्षात बुलेटप्रूफ जॅकेट किंवा लढाऊ विमानेही खरेदी केली नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील.

ते म्हणाले, ‘प्रश्न असा येतो की काँग्रेसने 40 पर्यंत वन रँक, वन पेन्शन दिली नाही. त्यानंतर मोदी सरकार आले आणि 1 लाख 20 हजार कोटी रुपये दिले. ज्याला 2500 रुपये पेन्शन मिळायची त्याला आज 25 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत आहे. आता आपण अग्निवीर बद्दल बोलूया, समजा 100 जणांची भरती झाली. सर्वांना चार वर्षे सैन्यात सेवा द्यावी लागेल. चार वर्षानंतर 25 जण सैन्यात राहतील आणि 75 जणांना वेतनाव्यतिरिक्त सुमारे 20 लाख रुपये मिळतील. यानंतर ते केंद्रीय राखीव दलासाठी पात्र ठरतील. यामध्ये त्यांना 10 ते 20 टक्के आरक्षण दिले जाईल जेणेकरून त्यांना रोजगार मिळू शकेल.

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, ‘अग्नवीरला राज्य पोलिसातही भरती करता येते. भाजपकडे 18 राज्ये आहेत जिथे पोलिसात नोकरी मिळू शकते. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्येही रोजगार मिळू शकतो. अग्निवीरला 100% रोजगाराची हमी आहे. सरकारने एक चांगले पाऊल उचलून अग्निवीर योजना आणली आहे. यामुळे आमच्या लष्कराचे सरासरी वयही कमी होईल, असे उदाहरण देत ठाकूर म्हणाले की, टायगर हिलवर जाणारे सैनिक हे सर्वात लहान आहेत. डोंगर चढण्यासाठी युवाशक्तीची गरज आहे. जगभरात हीच स्थिती असून कारगिलमध्ये हिमाचलमधील तरुण सर्वाधिक शहीद झाले आहेत.