केळी लागवडीसाठी शेतात गेले, अचानक संकट कोसळलं; घटनेनं जळगाव जिल्ह्यात शोककळा

जळगाव : केळी लागवडीसाठी पावटी पाडत असताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. विकास धर्मा निकुंभ (२३) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथे आज ८ रोजी सकाळी ही घटना घडलीय. तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ हा काका राजेंद्र निकुंभ, चुलत भाऊ साई व यश निकुंभ यांच्यासोबत शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होता. पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारने ते आखणी करत असताना पावटी पाडण्यासाठी जो तार वापरण्यात आला होता. तो तुटल्याने शेतातून गेलेल्या लाईनवरीला विद्युतप्रवाह संचारला. यात विकास धर्मा निकुंभ यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागीच बेशुद्ध पडले.

सदर प्रकार काका व चुलतभाऊंच्या लक्षात येताच विकास यास तात्काळ कजगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केलं. यावेळी घटना गावात कळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. विकास यांचे पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे.