गाडीखाली कुत्रा आला तरी… गोळीबारावर फडणवीस आणखी काय म्हणाले ?

मुंबईतील दहिसर या उपनगरी भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मानसिक स्थितीवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, घोसाळकरांची हत्या ही गंभीर घटना आहे, मात्र गाडीखाली कुत्राही आला तर विरोधी पक्ष गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील, असं  फडणवीस यांनी म्हटलं आहे.