चारित्र्यावर संशय घ्यायचे; मग विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन… पुढे काय घडलं?

जळगाव : चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल व्यास यांचा विवाह पुणे येथील वडगाव शेरी येथील कुणाल अशोक व्यास यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर पतीसह सासरच्यांकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली जात होती. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या, त्यांनी रविवारी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली.

त्यानुसार पती कुणाल अशोक व्यास, गिता अशोक व्यास व नणंद कोमल अशोक व्यास सर्व रा. वडगाव शेरी पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येउलकर हे करीत आहे.