जळगाव जिल्ह्याला मिळाले तीन मंत्रीपद, आमदार अनिल पाटलांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई- राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी केली असून उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील शपथ घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता तीन मंत्रीपद मिळाली आहे.

अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असतात. त्यामुळेच त्यांना या सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे, संजय बनसोडे  यांनी शपथ घेतली आहे.