जळगाव : साडेतीन हजार एकर गायरान जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। जळगाव जिल्ह्यातील कृषी फिडर सौर उर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या महत्त्वकांशी योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त सौर विद्युत उर्जीकरण उपकेंद्र होणार आहेत.यामधून 700 मेगा वाईट विजनिर्मिती होणार असून त्यासाठी 3563 एकर कायरान जमीन जिल्हा प्रशासनाला भाडे तत्त्वावर मिळाले आहेत.

महावितरण व जिल्हा प्रशासन या जागेसाठी प्रयत्नशील होते. जमिनी देण्याबाबत ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आले होते. राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा कृषी वीज वाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करून दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे.

आवश्यक असणारी जमीन तातडी ने उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हासाठी समिती गठीत करण्यात आली होती. योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या पाच प्रकल्प कार्यान्वित करून सौरऊर्जा प्रकल्प महावितरणाच्या जवळच्या 33/11 जोडला जाईल त्यामुळे या कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा 20 देण्याचा महावितरणाचा प्रयत्न आहे.

याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की सुमारे 3563 एकर गायरान जमीन यावर सातशे मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेले सौर पॅनल जळगाव जिल्हा प्रशासनाने एम एस ई बी सोलर ऍग्रो पावर लिमिटेडला भाडे तत्त्वावर दिले आहेत. सर्व ग्रामपंचायती वनपाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेच्या मेहनतीचे हे फलित आहे. सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचन यंत्रणेला वीज देण्यासाठी दिवसा वीज मिळेल ग्रामपंचायतींना  उत्पन्न मिळेल आणि जळगाव जिल्हा राष्ट्रीय पावर ग्रीड मध्ये शाश्वत पर्यावरण पूरक नवीकरणीय ऊर्जा जोडेल जे  भारताच्या महाराष्ट्राच्या आणि जळगावच्या विकासात योगदान देईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारींनी दिली आहे.