टीम इंडियातून आऊट झालेला हा खेळाडू, आता रणजीत नशीब आजमावणार !

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला अफगाणिस्तान मालिकेत संधी मिळालेली नाही. टीम इंडिया 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे, मात्र यादरम्यान श्रेयस अय्यर टी-20 टीम सोडताना दिसत आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

टीम इंडियातून आऊट असलेला श्रेयस अय्यर आता रणजी ट्रॉफीमध्ये आपली छाप पाडणार आहे. १२ जानेवारीपासून मुंबई आणि आंध्र प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार असून, त्यात श्रेयस अय्यरही सहभागी होणार आहे. या रणजी मोसमातील मुंबईचा हा दुसरा सामना असेल, पहिल्या सामन्यात मुंबईने बिहारचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला होता.