तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

नाशिक : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. यावर आज राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा आजचा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला” असा सवाल मनोज जरांगे यांना केला आहे.