तोडगा निघणार? सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणास्थळी

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज गुरुवारी अंतरवाली सराटीत येणार आहे. त्यांच्याशी शेवटची चर्चा होणार आहे. या शिष्ठमंडळाला कोणीही आडवे येणार नाही, असा शब्द दिल्याचे उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी बुधवारी माध्यमांची बोलताना सांगितले.

तत्पूर्वी, आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर जरंगे पाटील यांनी निवडलेल्या शिष्टमंडळाची चर्चा केली. तेथूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान, मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालली आहे. तर दुसरीकडे सरकार फारकाही हालचाली करताना दिसत नाही. त्यामुळे भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जरांगे पाटील यांनी ही शेवटची चर्चा होईल, असे सांगत तोडगा काढण्याची मागणी केली आहे. आज गुरुवारी जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नेमके कोणते मंत्री आहेत याची अद्याप स्पष्टता नाही.