दक्षिण आफ्रिका १७६ धावांत सर्वबाद, भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य

sa vs ind : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. सामन्याचा आज (दि. ४ जानेवारी) दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. आज दुसऱ्या डावात भारताने द. आफ्रिका १७६ धावांत गुंडाळले आहे. आता टीम इंडियाला या सामन्‍यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ७९ धावांचे लक्ष्य आहे.