Viral News : दिरासोबत पळून जाऊन केलं लग्न; पण… आता पतीच्या घरासमोरच संपावर बसली महिला

पत्नीने दिरासाठी पतीला सोडल्याची घटना समोर आली आहे. दीर आणि वहिनी पळून जाऊन लग्न केलं मात्र, नंतर दिराने वहिनीशी संबंध तोडले. आता ना नवरा महिलेला सोबत ठेवायला तयार आहे ना दीर. यामुळे आता महिला तिच्या मुलासह पतीच्या घरासमोर संपावर बसली आहे. तिला मनीष ‘दीरा’सोबत राहायचे आहे, असे महिलेचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण देवी गेल्या सात दिवसांपासून सरपंचाच्या घराबाहेर ठाण मांडून आहेत. या प्रकरणी किरण देवी म्हणाल्या की, सरपंचाचा मुलगा मनीष हा तिचा दीर आहे. दोघांचे गेल्या पाच वर्षांपासून अफेअर होते. दोघेही गुप्तपणे भेटत राहिले. महिनाभरापूर्वी ती पतीला सोडून प्रियकर दिरासोबत दिल्लीला पळून गेली होती. तिथल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केलं. मात्र महिनाभरानंतर दीर तेथूनही फरार झाला.

मी मनीषला अनेकदा फोन केला, पण त्याने उत्तर दिले नाही. मी दिल्लीत कोणाला ओळखतही नव्हते. अशा परिस्थितीत काही लोकांनी मला मदत केली. त्यांनी माझे ट्रेनचे तिकीट काढले आणि मला ट्रेनमध्ये बसवले. तेव्हाच मी घरी पोहोचली.

मी माझ्या पतीकडे गेल्यावर त्यांनीही मला सोबत ठेवण्यास नकार दिला. मी मनीषच्या सरपंच वडिलांना माझा त्रास सांगितला तेव्हा त्यांनीही मला घरात येऊ दिले नाही. अशा परिस्थितीत मी आणि माझ्या मुलाने कुठे जावे हेच समजत नाही. मला मनीष ‘दीरा’सोबत राहायचे आहे.

मी मूळची जमालाबादची रहिवासी आहे. सोळा वर्षांपूर्वी माझे लग्न प्रमोद दास यांच्याशी झाला होता. मनीष नात्याने माझा दीर लागतो. तो मला फोन करायचा. मलाही त्याच्याशी बोलायला आवडायचं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते आम्हाला कळलंही नाही. माझ्या मुलाचाही जन्म झाला. दुसरीकडे मनीष आणि माझ्यातलं प्रेमही वाढतच गेलं. तेव्हा मनीषने मला सांगितले की, आपण दोघांनी येथून पळून दिल्लीला जावे. त्याच्या बोलण्याने मीही प्रभावित झाले, असं महिलेने सांगितले.

किरण देवीने पुढे सांगितले की, महिनाभरापूर्वी आम्ही दिल्लीला पळून आलो. मनीष तेथे मजूर म्हणून काम करायचा. पण महिनाभरातच त्याने माझी अशी फसवणूक का केली हे कळत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझा निष्पाप मुलगा आणि मी एकटे पडलो आहोत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.