दुर्दैवी! बैलांसाठी गवत कापयाला गेले, अचानक… मुंगसे गावात शोककळा

जळगाव : बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बापू कोळी (३३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.  अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनेबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली की नाही हे कळू शकले नाही.

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथे  ज्ञानेश्वर बापू कोळी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दरम्यान, मुंगसे सावखेडा रस्त्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुरांसाठी चार कपात असताना अचानक विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ पुढील उपरासाठी चोपडाला हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  ज्ञानेश्वर बापू कोळी यांना मृत घोषित केले.

ज्ञानेश्वर बापू कोळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बहीण, आई-वडील व दोन काका असा परिवार आहे. ते माजी सरपंच बापू कोळी यांचा मुलगा होत.  ज्ञानेश्वर बापू कोळी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्ययात्रा उद्या, २५  रोजी  सकाळी ८ वाजता राहत्या घरून निघणार आहे.