दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, जळगावातील घटना

जळगाव : पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करताना विजेच्या धक्का बसल्याने ३८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू दुर्दैवी झाला.  ही  घटना शहरातील वाघ नगर परिसरात मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप हिरामण भालेराव असे मृत तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात संदीप भालेराव हा तरूण आपल्या आई, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सेक्यूरीटी गार्डची खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वाघ नगर परिसरात पिण्याचे पाण्याचे नळ आलेले होते. त्यावेळी घरी संदीप व त्यांची आई हे घरी होते. संदीप याने पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. दरम्यान संदीपच्या वडीलांचे अधीच निधन झालेले आहे त्यात आई दिव्यांग आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरूष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.