देवेंद्र फडणवीसांना एक फोन अन् ५८ भाविकांची झाली सुटका

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे नागरीक नेपाळ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असता त्यांना तीथे काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आले या प्रसंगी त्यांना या संकटातून सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करून मदतीची याचना करूनही प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली.