नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

नंदुरबार । जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

आदित्य आणि त्यांचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्यांचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

येत्या सोमवारी (22 जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदित्यच्या कुटुंबियांना हा पुरस्कार दिला जाईल. देशभरातल्या एकूण १९ बालकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात १८ राज्यातली ९ मुलं आणि १० मुलींचा समावेश आहे. कला-संस्कृती, क्रीडा, समाजसेवा, नवसंशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हे पुरस्कार दिले जातील.