नंदुरबारमध्ये भाजप महामंत्री चौधरींच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा; दिला बांगलादेशींना इशारा

वैभव करवंदकर
नंदुरबार :
बांगलादेशातील हिंदू बांधवांवर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नंदुरबार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. तसेच सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे महामंत्री विजय चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह असंख्य हिंदू बांधव सहभागी झाले होते.

बांगलादेशातील गुंड प्रवृत्तीचे मुस्लिम हिंदूंचे मंदिर, देवांची विटंबना, दुकानाची तोडफोड, हिंदू बांधवांवर अत्याचार व खून करत आहेत. त्यांनी हे तात्काळ थांबवावं. यापुढे त्यांनी एकही हिंदू बांधवांवर अत्याचार केला. वाईट नजरेनं पाहिलं. तर देशातील नागरिक, हिंदू बांधव ‘घरात, गावात येऊन, तुडल्या शिवाय राहणार नाही’ आता हिंदू समाज एक संघ झालेला आहे. आम्ही हे सहन करणार नाही. हिंदूंना कमजोर समजू नका, देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीजी आहे हे विसरू नका. यापुढे हिंदू बांधवांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमची खैर नाही, असा इशारा बांगलादेशींना  भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिला.

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज नंदुरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नंदुरबार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. तसेच सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

नंदुरबार शहरातील मोठ्या मारुती  येथून मोर्चाची सुरवात होऊन शिवाजी चौक, जलका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, हाट दरवाजा, नेहरू चौक, नगरपालिका, दीनदयाल चौक, संजय टाऊन हॉल, मोठा मारुती मंदिराजवळ समारोप करण्यात आला. या मोर्चात असंख्य युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावपूर्ण श्रद्धांजली
शहरातील मोठ्या मारुती मंदिराजवळ थांबवून बांगलादेशात झालेल्या हिंदू बांधवाची हत्या, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व मोर्चाचे शांततेत समारोप झाला.