नक्षलवाद्यांनी केली जनता दरबार लावून दोघाभाऊंची हत्या, गावात भीतीचे वातावरण

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन भावांची निर्घृण हत्या केली. जनता दरबारात दोन्ही तरुणांची गळा आवळून हत्या करण्यात आली. घटनेनंतर दोघांचेही मृतदेह नक्षलवाद्यांनी गावात फेकून दिले होते. दोन्ही भावांवर पोलिसांना मदत केल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

ही घटना ताररेम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जोगा मडवी आणि हुंगा मडवी हे ताररेम गावात चुलत भाऊ होते. बुधवारी नक्षलवाद्यांनी दोन्ही भावांना गावातून उचलून आपल्यासोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत जनअदालत होऊन दोघांवरही पोलिसांना सहकार्य केल्याचा आरोप करून त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

दोघांची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मृतदेह गावातच फेकून दिला. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी मृतदेह उचलून घरी आणला. विजापूर पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.