नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात, म्हणाले ‘घर चालविण्यासाठी…”

मुबई : खासदार संजय राऊतांनी माध्मांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. याला भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊत मोठा खोटारडा असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. ज्याने आपल्या आयुष्यात कधीच खर बोलला नाही तो फडणवीस साहेबांवर टीका करतो. शिवाय, घर चालविण्यासाठी शिंदेंकडुन पैसे घेतल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
नितेश राणे म्हणाले, “अनेकांचा बुरखा फडण्याचे काम फडणवीसांनी केले. ज्याने आपल्या आयुष्यात कधीच खर बोलला नाही तो फडणवीस साहेबांवर टीका करतो. राऊत मध्ये हिम्मत असेल तर खुल्या व्यासपीठावर यावं. संजय राऊत ने आमदारांना फोन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून सांगा आणि आपलं नाव पुढे केले होते. उद्धव ठाकरेंच नाव सुचवा असे सिल्वर ओक मध्ये जाऊन कोण रडल हे सुद्धा आम्ही सांगू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार हे जेव्हा संजय राऊत ला समजलं तेव्हा त्याने उद्धव ठाकरेंना काय काय शिव्या घातल्या याचे पुरावे आम्ही देऊ.संजय राऊत मोठा खोटारडा आहे.”
“हे पत्रकारितेला काळिमा फासणाऱ्या चीन व पाकिस्तानच्या बाजूने अग्रलेख लिहितात. देश विरोधी सतत भूमिका राऊत घेतोय. सामना वृत्तपत्रात येणारा पैसा कुठून येतो त्याची चौकशी करावी. संजय राऊत व उबाटा यांना संजय सिंग बद्धल सहानुभूती आहे. कारण ती नाईट लाईफ गॅंग, बेवड्या लोकांची गॅंग आहे. साडेसात नंतर एकत्र येणारे मित्र आहेत.” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
उबाठा गटावर बोलताना राणे म्हणाले, “अजित दादांवर आता टीका केली जात आहे. एकत्र होते तेव्हा 70 हजार कोटी दिसले नाहीत का? आमच्या वर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघा. कोवीड काळात जेवढा खर्च दाखवला तो झालाच नाही. त्यांच्या काळात आरोग्य सेवा विस्कळीत होती. मात्र आज सुधारणा होत आहे. वर्षा वर जाऊन हाऊस किपिंग च काम बंद करा. सगळे 420 लोक एकत्र येऊन इंडिया अलायन्स स्थापन केले आहे. कुठल्याही सरकारला यापूर्वी जमलं नाही ते आमच्या सरकारने केले. काँग्रेसचे स्वतःच आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा सक्षम आहेत.” असं नितेश राणे म्हणाले.