निवडणुका होणे बाकी, पण पंतप्रधानांनी तयार केला 100 दिवसांचा आराखडा

पीएम मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा रोडमॅपही त्यांनी दिला आहे. निवडणुका होणे बाकी आहे, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सरकारसाठी 100 दिवसांची योजना तयार केली आहे. सोबतच ‘400 पार केल्यानंतर संविधान रद्द होईल’ या काँग्रेसच्या आरोपावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.