नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरुन घसरले; चार प्रवाशांचा मृत्यू, २०० जखमी

तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३।  बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचे २१ डब्बे रुळावरून घसरल्याने रेल्वेचा भीषण अपघात झाला. या भयंकर अपघातात दोनशे प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. दिल्लीहून कामाख्याला गुवाहाटी येथे जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला हा अपघात झाला. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,दिल्लीहून ही रेल्वे कामाख्याला जात होती. ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह २१ डबे रुळावरुन घसरले. या अपघातात जखमींना तात्कळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.

दरम्यान आम्ही सर्व डब्यांची माहिती घेतली आहे. तसेच बचावकार्य पूर्ण झालं असून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये दिली आहे.