पवार गटातील लोकचं पक्ष संपवायला पुरेसे आहेत, असं का म्हणाले छगन भुजबळ ?

शरद पवारांचा उरला सुरला गट संपवायला आणखी कुणाची गरज नसून पवार गटातील लोकचं पक्ष संपवायला पुरेसे आहेत, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वकतव्याचा समाचार घेत भुजबळ म्हणाले, आपण एक म्हण ऐकली असेल अति शहाणा त्याचा बैल रिकामा. त्यामळे त्यांना संपविण्यासाठी आणखी कुठल्या दुसऱ्या पक्षाला काही करण्याची गरज नसल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

दरम्यान, शरद पवार गटाला पुन्हा एकदा साद घालण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार यांनी सोबत यावे, असे आवाहन करतानाच त्यांचे आशीर्वाद म्हणजे सोन्याहून पिवळे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.