बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले, सरकार काय करतंय ? जयशंकर यांनी दिले उत्तर

Bangladesh Violence : बांग्लादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेख हसीना यांचं सरकार कोसळलय, त्यांनी देश सोडलाय. वरकरणी मागच्या एक महिन्यापासून बांग्लादेशात आरक्षण विरोधी आंदोलन सुरु आहे. या संदर्भात आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेश लष्कराशी संपर्क ठेवत असल्याचे सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठकीत कोणत्याही नेत्याने शेख हसीना यांच्या भारतात राहण्यावर प्रश्न उपस्थित केला नाही. सरकारने सांगितले की, शेख हसीना ज्या परिस्थितीत आहे, तो विचारात घेऊन सरकार त्यांना आश्रय देऊ इच्छित आहे, जेणेकरून त्या पुढे काय करायचे हे ठरवू शकेल.

या बैठकीत भारतातील विद्यार्थ्यांचे काय होणार ? हिंदूंवरील हल्ल्यांबाबतही एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर सरकारने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहोत. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे समर्थन केले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, परिस्थिती निर्माण होईल तशी माहिती दिली जाईल. सरकार बांग्लादेशात लष्कराच्या संपर्कात आहे. सीमेवर सध्या काळजी करण्याची गरज नाही. सल्लागारानंतर 8 हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत.