---Advertisement---

बाबर आझमचा 20-30 षटकांत प्लॅन, जो पाकिस्तानला उपांत्य फेरीत घेऊन जाईल

---Advertisement---

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषकात विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता, पण जेतेपद सोडा, संघ त्याच्या जवळपासही जाण अशक्य झालय. न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर अशक्य ते शक्य करून दाखवावे लागेल आणि त्यासाठी आपल्या संघाने प्लॅनही तयार केल्याचे कर्णधार बाबर आझमने जाहीर केले आहे.

8 पैकी 4 सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आधीच मावळल्या होत्या. त्यांना श्रीलंकेची मदत हवी होती पण तसे झाले नाही आणि न्यूझीलंडने त्यांचा सहज पराभव केला. यासह न्यूझीलंडचे स्थान जवळपास निश्चित झाले आणि पाकिस्तानचा खेळ जवळपास संपला. आता पाकिस्तानला करिष्मा करण्याची गरज आहे आणि त्यासाठी इंग्लंडला २८७ धावांनी पराभूत करणे किंवा ३ षटकांत धावांचा पाठलाग करणे आवश्यक आहे.

आता 3 षटकात धावांचा पाठलाग करणे हे समीकरण अशक्य आहे पण पहिल्या समीकरणापासून अजूनही निव्वळ धावगती न्यूझीलंडच्या पुढे जाण्याची किरकोळ शक्यता आहे आणि पाकिस्तानी कर्णधारालाही तीच आशा आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी बाबर आझम जेव्हा मीडियासमोर आला तेव्हा त्याला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच होते. बाबर म्हणाले की क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे आणि त्यांचा संघ या स्पर्धेचा उच्चांकावर शेवट करण्याचा प्रयत्न करेल.

पाकिस्तानी कर्णधार पुढे म्हणाला की त्याच्या संघाची निव्वळ धावगती सुधारण्याची योजना आहे आणि ते मैदानावर त्याची अंमलबजावणी करतील. त्याने आपल्या योजनेची थोडक्यात झलक दिली, जी प्रामुख्याने स्फोटक सलामीवीर फखर जमानभोवती फिरते. बाबर म्हणाले की, संघाने पहिल्या 10 षटकांसाठी आणि त्यापुढील षटकांसाठी योजना तयार केली आहे. फखर 20-30 षटके टिकला तर त्याचा संघ हा धावगती गाठू शकेल, अशी आशाही बाबरने व्यक्त केली.

आता बाबर आणि त्याच्या टीमने एक योजना आखली असेल पण ती सोपी अजिबात होणार नाही. इंग्लंडविरुद्ध सुमारे 287 धावांनी विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला स्वतःला 400 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील आणि त्यानंतर इंग्लंडला 120 पेक्षा कमी धावा करून बाद करावे लागेल. या विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी चांगली झाली नसेल, पण हा सामना त्यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे कारण येथे जिंकूनच त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीट मिळू शकेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment