बालबुद्धीवर मी काय बोलणार… आदित्य ठाकरे यांच्यावर कुणी सोडलं टीकास्त्र?

ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात आला आहे. मात्र, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी याबद्दल प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

“ही वाखनखे परतावा आहेत का?”, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावरून त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. फडणवीस यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पुरावे मागणं ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मी बालबुद्धीवर काय बोलणार?, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.