भरघाव ट्रकची कारला जोरदार धडक; पाच जिवलग मित्रांचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशातच भिवानी जिल्ह्यातून अपघात झाल्याची बातमी समोर येतेय. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिल्याने जिवलग मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ५ जिवलग मित्र मंगळवारी पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री उशीरा कारने आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात होते. यानंतर भिवानी जिल्ह्यातील बहल भागातील सेर्ला गावाजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत पाचही मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचाही जागीच मृत्यू झाला.

प्रदीप (वय 30, रा. लडियानली), रवी (वय 22, रा. इंदिवली गाव), जितेंद्र (वय 30, रा. नारनौंड), विकास (वय 28) आणि नसीब (वय 27, रा. बुडेडा गाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. तर ट्रकमधील क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच तरुणांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत आक्रोश केला.