भरधाव कंटेनरने रिक्षाला उडवलं; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। बीड जिल्ह्यातून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. भरगाव वेगात येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बीड मधील अजीम शेख हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण  येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरवरील आपला ताबा सुटला. यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला खूप जोरदार धडक बसली.अपघात एवढा भीषण होता की ॲपे रिक्षाचा अक्षरशा चुराडा झाला. या अपघातात नसरीन अजीम शेख  नोमान अजीम शेख आणि अदनान अजीम शेख  हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले.

तर रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. सासुरवाडीवरून येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.