भांडण सोडविण्यासाठी गेले, त्यांच्यावरचं जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

जळगाव : जुन्या वादातून चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टॉपवर पाच जणांचा वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोन रिक्षाचालकांवर चॉपर व फायटरने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.