भाजप-मनसे युती होणार ? पत्रकार परिषदेत काय म्हणाले राज ठाकरे ?

भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी भेट झाली यावेळी या दोन नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याच्या चर्चा आहेत. आगामी लोकसभा आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांदरम्यान भाजप मनसेला सोबत घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबाबत आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी एका ओळीत विषय संपवला.

काय म्हणाले राज ठाकरे ?
पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीवर आणि चर्चेवर बोलणं टाळल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांनी ‘माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं आहे तेव्हा मी निवडणुकीवर बोलेल.’ असं म्हटलं.