भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. जिल्ह्यातील बौली पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या बनास कल्व्हर्टजवळ कार आणि वाहनाची धडक झाली.

या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघातातील सर्व बळी हे सीकर जिल्ह्यातील खंडेला येथील रहिवासी आहेत. सर्व एकाच कुटुंबातील सदस्य होते.

हे सर्व लोक त्रिनेत्र गणेशाचे दर्शन घेण्यासाठी सीकरहून सवाई माधोपूरच्या रणथंबोरला जात होते. अपघाताची माहिती मिळताच बौली पोलीस ठाणे आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. अपघातात जखमी झालेली मुले आणि सहाही मृतदेह बौलीच्या सीएचसीमध्ये नेण्यात आले.