भुसावळातील कुविख्यात निखील राजपूतची कौटूंबिक वादातून हत्या

भुसावळ : शहरातील दोघा भावंडांच्या खुनाला 24 तास उलटत नाही तोच कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. कौटूंबिक वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर काही संशयितांमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाद झाल्याने निखीलच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करून खून करण्यात आला आहे.

तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या भावंडांची तलवारीसह चाकूने वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती तर या हल्ल्यात इंगळे व साळुंखे नामक तरुणदेखील जखमी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या हत्याकांडाच्या अवघ्या चार तासानंतर श्रीराम नगरात हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.