मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अहिल्यादेवी होळकर नंतर मोदींचे योगदान सर्वश्रेष्ठ

चाळीसगाव : अयोध्येत पंधराशे वर्षांपूर्वी मंदिर असल्याचे अवशेष मिळाले हे अवशेष हा देश हिंदुराष्ट्र असल्याचा पुरावा होता. ज्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू धर्म जागवण्याचे काम केले तेच काम आज अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणी करून नरेंद्र मोदी यांनी केले असून जगाच्या कानाकोपऱ्यात जय जय श्रीरामाचा जयघोष गुंजणार असून हा युवकांचा देश येत्या काळात हिंदु राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन देशातील आघाडीच्या प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे.

आज खासदार उन्मेश पाटील आणि संपदाताई पाटील आयोजित उमंग व्याख्यानमालेच्या 10 व्या वर्षाचे प्रथम पुष्प गुंफताना काजल हिंदुस्थानी बोलत होते. आज अंधशाळेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीच्या औचित्याने खासदार उन्मेश दादा पाटील तसेच उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील आयोजित उमंग व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला.

सुरूवातीला योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, कारसेवक बाळासाहेब नागरे, जेष्ठ नेते के बी दादा साळुंखे, नगराध्यक्ष करन दादा पवार, पारोळा नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अंजली करण पवार, ज्येष्ठ नेते पोपट भोळे, प्रीतमदास रावलानी, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर तात्या पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजूअण्णा चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री ह.भ.प.संदीप महाराज, प्रखंड मंत्री विजय शेठ बाविस्कर, शहर मंत्री अविनाश चौधरी, दुर्गा वाहिनी प्रखंड संयोजिका अश्विनी गढरी, प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका वंदना दिदी, माजी शहराध्यक्ष लालचंदजी बजाज, उद्योजक केशव कोतकर, माजी नगरसेविका वत्सला कोतकर, दिव्यांगांच्या आधारस्तंभ मीनाक्षी निकम, आदर्श शिक्षक शालिग्राम निकम, शीघ्र कवी रमेशजी पोतदार, श्रीनिवास खंडेलवाल,अरुण राणा, बबन पवार, निशाताई महाशब्दे, शरद मोराणकर, माजी सभापती सरदारशेठ राजपुत, माजी सभापती स्मितल बोरसे, दिनेश भाऊ बोरसे, नगरसेविका संगीता गवळी, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, प्रवीण अमृतकर, सामाजिक कार्यकर्ते नरेनकाका जैन, उद्योजक पद्माकर पाटील, रवींद्र शुक्ल, समकीत छाजेड, अमित सुराणा, मधू कासार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आपण श्रोते नसून नव युगाचे निर्माते आहात

गेल्या दहा वर्षांपासून 12 जानेवारी ते 14 जानेवारी या थंडीच्या मोसमात दरवर्षी विचारांची उबदार मेजवानीसाठी आपण उपस्थीत राहतात यांचा मनस्वी आनंद आहे. येथील श्रोता यांच्याशी माझी वैचारिक भावनिक आणि आदराची नाळ जुळली आहे. माझ्या राजकीय जीवन प्रवासात आपण मला भरभरून आशीर्वाद दिले आहे. आपण श्रोते नसून नव युगाचे निर्माते असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी राज्याचे मानद वन्यजीव संरक्षक सर्पतज्ञ राजेशजी ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. उमंग सृष्टी परिवाराच्या संपदाताई पाटील यावेळी म्हणाल्या काजल हिंदुस्तानी सारखी महिला प्रखर ज्वलंत हिंदुत्व राष्ट्राचा विचार घेऊन आपल्यासाठी उपस्थित झाल्या आहेत. आपण एक पालक म्हणून आपल्या पाल्यावर संस्काराची जबाबदारी कशी पार पाडावी यासाठी काजल हिंदुस्तानी यांच्या विचारांचा हुंकार ही कर्तव्याची शिदोरी असणारं आहे. सूत्रसंचालन रीनी शर्मा तर आभार राजेश ठोंबरे यांनी मानले.व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी, युवक उपस्थित होते.