सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेल्या मध्य प्रदेशच्या माजी उपजिल्हाधिकारी (एसडीएम) निशा बांगरे यांचा काही महिन्यांतच राजकारणातून भ्रमनिरास झाला आहे. आता तिला पुन्हा सरकारी नोकरी करायची आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी निशा बांगरे यांनी उपजिल्हाधिकारी पद सोडले होते, मात्र आता त्यांना पुन्हा सरकारी नोकरी करायची आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांचा आता राजकारणातून भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी सरकारला त्यांचे पद परत करण्याची मागणी केली आहे. निशा यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून त्यात तिने उपजिल्हाधिकारी पद परत हवे असल्याचे नमूद केले आहे.