मुंबईत एकाच धावपट्टीवर दोन विमाने, डीजीसीएने दिले तपासाचे आदेश

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळातच दोन विमाने एकाच धावपट्टीवरून उड्डाण घेतले. या टेकऑफ आणि लॅण्डिंगमध्ये काही सेकंदांचे अंतर होते. जर ही वेळ चुकली असती तर दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला असता. शेकडो विमान प्रवाशांच्या आणि केबीन क्रू मेंबर्सच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या असत्या. मात्र सुदैवाने हा अपघात टळला.

डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले
त्याच धावपट्टीवर एक विमान लँडिंग आणि दुसरे विमान टेक ऑफ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आला आहे. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही तपास करत आहोत आणि या घटनेत सहभागी असलेल्या एटीसीओला आधीच कर्तव्यावरून काढून टाकण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून येणारे इंडिगोचे 5053 हे विमान धावपट्टी 27 वर उतरत होते, तर एअर इंडियाचे विमान 657 तिरुवनंतपुरमसाङ्गी टेकऑफ करण्याच्या तयारीत होते.

मुंबई आणि दिल्ली विमानतळे ही सर्वात व्यस्त विमानतळे आहेत. या दोन्ही विमानतळांवर दर तासाला सुमारे 46 उड्डाणे होतात, तर दिवसाला हजारांहून अधिक उड्डाणे होतात. विमान आणि प्रवाशांची सुरक्षा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची जबाबदारी आहे. विमानांच्या टेकऑफ आणि लॅण्डिंगच्या वेळी दृश्यमानताही चांगली होती. त्यामुळे नेमके कुङ्गे चुकले आणि काय चुकले याबाबतची चौकशी सुरू आहे, असे आलोक यादव यांनी सांगितले.