मौर्या ग्लोबलची आग अद्यापही शमली नाही, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न

जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत एकूण ३५ कामगार होते त्यापैकी १५ कामगारांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी २० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.

जळगाव, जामनेर, जैन इरिगेशन कंपनीच्या अग्निशन दलातर्फे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.