---Advertisement---

म्यानमारच्या 151 सैनिकांनी घेतला भारतात आश्रय! जाणून घ्या का त्यांना देश सोडावा लागला?

---Advertisement---

नवी दिल्ली । भारताचा शेजारी देश म्यानमार गेल्या काही वर्षांपासून वांशिक संघर्षाशी झुंजत असल्यामुळे हजारो रोहिंग्या मुस्लिम भारतात अवैधरित्या घुसले. म्यानमारमधील वांशिक संघर्ष अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. त्याचा परिणाम आजही दिसून येत आहे. आतापर्यंत रोहिंग्या मुस्लिम भारतात घुसल्याची चर्चा होती, मात्र यावेळी म्यानमारच्या सैनिकांना भारतात आश्रय घ्यावा लागला.

अलीकडेच म्यानमारचे १५१ सैनिक उत्तर-पूर्व राज्य मिझोराममध्ये आले आणि त्यांनी आसाम रायफल्सच्या छावणीत आश्रय घेतला. हे सैनिक सशस्त्र वांशिक गटाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी भारतीय सीमेवर आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक जवानांना आसाम रायफल्सच्या जवानांनी प्राथमिक उपचार केले. या जवानांना लवकरच त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय सीमेजवळील म्यानमारच्या सैनिकांच्या तळांवर शुक्रवारी अराकान आर्मीच्या सैनिकांनी हल्ला करून ते ताब्यात घेतले. त्यानंतर लष्कराचे किमान १५१ जवान आपली शस्त्रे घेऊन मिझोरामच्या लोंगतलाई जिल्ह्यातील तुइसेंटलांग येथील असर रायफल्स कॅम्पमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितले की, म्यानमार आर्मीचे सैनिक ‘तत्मादव’ म्हणून ओळखले जातात. येथे पोहोचल्यानंतर जखमी जवानांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये, म्यानमार-भारत सीमेवरील त्यांच्या लष्करी छावण्या लोकशाही समर्थक मिलिशिया – पीपल्स डिफेन्स फोर्सने ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतरही म्यानमार लष्कराचे सुमारे 104 सैनिक मिझोराममध्ये पळून गेले होते. यानंतर त्यांना भारतीय हवाई दलाच्या विमानाने मणिपूरमधील मोरे येथे आणण्यात आले. तेथून त्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि त्याला म्यानमारच्या जवळच्या सीमावर्ती शहर तामू येथे पाठवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment