राज्यसभेत बदलणार राजकीय चित्र, 56 जागांवर कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान ?

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आली आहे. देशातील 15 राज्यांतील या 56 जागा असून 27 फेब्रुवारी रोजी यासाठीची मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. विशेषतः निकालही त्याच दिवशी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत वरिष्ठ सभागृहातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकते, असा अंदाज अनेकांकडून लावला जात आहे.