राम मंदिर उघडले, आता पीएम मोदींची ही योजना बदलणार अयोध्येचे भाग्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारीला ‘बालक राम’चा अभिषेक केला. तेव्हापासून राम मंदिरात दररोज लाखो लोक दर्शनासाठी येत आहेत. राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येत अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू झाले असून आता पीएम मोदींची एक योजना अयोध्येचे भाग्य बदलणार आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ६७.५७ किमी लांबीचा अयोध्या बायपास बांधला जात आहे. हे पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत विकसित केले जात आहे. यामुळे अयोध्येच्या आसपासच्या भागात मालाची अखंडित वाहतूक सुलभ होईल. अयोध्येच्या मुख्य रस्त्यांवर कमी गर्दी होईल. हा बायपास लखनौ, बस्ती आणि गोंडा यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करेल.

अयोध्या हे उत्तर प्रदेशातील लखनौ आणि गोरखपूर या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांच्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे अयोध्येतून चामडे, अभियांत्रिकी वस्तू, बांधकाम साहित्य, लोखंड, पोलाद यासारख्या वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात जातात. अशा परिस्थितीत एकीकडे बायपासमुळे अयोध्येतील गर्दी कमी होईल, तर दुसरीकडे लोकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था सुधारेल.

राष्ट्रीय नियोजन गटाच्या (NPG) बैठकीत पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत योजनांना मंजुरी दिली जाते. त्याची बैठक दर 15 दिवसांनी होते. 500 कोटींहून अधिक गुंतवणुकीचे सर्व लॉजिस्टिक आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प NPG द्वारे मंजूर केले जातात.