राहुल गांधींकडे चांगलं वत्कृत्व नाहीत; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी खासदार सुस्मिता देव, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार उल्हास पवार, युनिव्हिर्सिटीचे अध्यक्ष राहुल कराड, संस्थापक विश्वनाथ कराड उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात प्रवेश करावा. राष्ट्रभाव, दूरदृष्टी आणि भाषेवर नियंत्रण यांसारखे गुण राजकारणात येतांना अंगी असायला हवे. राजकारणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकस्तरावर काम करावे लागेल. धर्म-जातींचे राजकारण करून, क्षणिक फायदा घेता येईल. मात्र, आपल्याला माणसाला माणसांशी जोडणारे राजकारण करायचे आहे. द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून काम करायचे आहे. समाजाचा विचार करून, काम कराल तर मोठे नेचे व्हाल. स्वत:चा विचार करून वाटचाल करून, नेते होता येणार नाही.” असं वडेट्टीवार म्हणाले.
यावर भाजप नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार लवकरच पक्षांतर करतील असं वाटतयं. विजय वडेट्टीवारांच्या राहुल गांधी यांच्यावरील प्रतिक्रीयेनंतर आशिष देशमुख यांनी ही प्रतिक्रीया दिली. राहुल गांधी उच्चशिक्षीत आहेत मात्र ते वक्ता चांगले नाहीत असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.