राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी; देवेंद्र फडणवीसांचा भुसावळातून हल्लाबोल

भुसावळ : लोकसभा निवडणुकींसाठी महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी’ म्हणत इंडिया आघाडीवर हल्लबोल केला आहे.

रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज येथे पार पडली. या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपली विकासाची गाडी आहे. या विकासाच्या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे. त्याला वेगवेगळ्या पक्षाचे ढबए लागले आहेत. या डब्यांमध्ये दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्यांक, विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यामध्ये सामावून घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ म्हणून मोदीजींच्या इंजिन्स प्रमाणे पुढे जाते आहे, असेही ते म्हणाले.